सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?
सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल? संजय पाठक, नाशिक : तो एक काळ होता. शहरी भागातील सर्व मतदार अक्षरश: भारावले होते. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्येष्ठांच्या बरोबरच किशोरवयीन आणि शाळकरी मुलांचा सुद्धा पॅशन बनला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी साद घालावी आणि त्याला प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून तर मिळायचाच परंतु त्याला जनभावनेची साथदेखील असायची. परंतु २०१४ नंतर सारे राजकारण बदलले. पारंपरिक राजकारणाचे आयाम बदले. मनसेची ताकद क्षीण होत गेली आणि पुन्हा राज यांची राजकीय भूमिकादेखील बदलत गेली. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधात बोलणारे राज हे त्यांच्याच वळचणीला बसले, अशी टीका होऊ लागली. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नाही परंतु लोकसभेच्या प्रचारात मोदी आणि शहा यांच्या विरोधातील मैदान मात्र राज यांनी गाजवले, परंतु नंतर त्याचा उपयोग न झाल्याने स्वत:च राज निराश झाल्याचे सांगितले जात असून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरायचे की नाही, याबाबत ते निर्णय घेण्यास तयार नाही. आता कुठे ते लढण्याच्या मानसिकतेत आल्याचे सूत्रांनी सांगितले असले तरी गेल्या २००९ ते २०१९ या...